पुणे : पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये वॉटर कुलरमधून पाणी पिताना लागलेल्या विजेच्या धक्क्यामुळे एका 23 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्

पुणे : पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये वॉटर कुलरमधून पाणी पिताना लागलेल्या विजेच्या धक्क्यामुळे एका 23 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून मृत्यूशी झुंज देणार्या या तरुण विद्यार्थ्याने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य कुंडलिक चव्हाण असे मृत विद्यार्थ्याचे नाव होते. चैतन्य हा कृषी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि सध्या एबीएम, सीओएचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.

COMMENTS