Homeताज्या बातम्यादेश

बिहारमध्ये रेल्वे अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीहून गुवाहाटीला जात असणार्‍या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसला काल रात्रीच्या सुमारास बिहारमध्ये भीषण अपघात झाला, या अपघातात रेल्

बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात
पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, 15 ठार, 50 जखमी
रेल्वे अपघातात मृत्यूचे तांडव

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीहून गुवाहाटीला जात असणार्‍या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसला काल रात्रीच्या सुमारास बिहारमध्ये भीषण अपघात झाला, या अपघातात रेल्वेचे तब्बल 21 डब्बे रुळावरून घसरले असून, या अपघातात आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातात वाढ होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
या अपघातामध्ये शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकार्‍यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डब्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. गेल्या सहा महिन्यातील रेल्वे अपघाताची ही दुसरी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नॉर्थ-इस्ट एक्सप्रेस राजधानी दिल्लीच्या आनंद विहार स्टेशनवरून गुवाहाटीच्या कामाख्या स्टेशनकडे निघाली होती. ट्रेन बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आली असता, दानापूर विभागातील रघुनाथपूर स्टेशनजवळ दोन एसी डब्यांसह 21 डबे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर केंद्रीय मंत्री अश्‍विनी चौबे यांनी दु:ख व्यक्त केले असून घटनेसंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मी केदारनाथला प्रार्थना करतो की सर्व प्रवासी सुरक्षित असावेत. मदतकार्य सुरू झाले आहे. वैद्यकीय पथक आणि वरिष्ठ अधिकार्‍यांसह अपघातग्रस्त मदत वैद्यकीय व्हॅन अपघातस्थळी पोहोचले आहे, असे ट्वीट मंत्री अश्‍विनी चौबे यांनी केले आहे.

COMMENTS