शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टयांचा संभ्रम दूर करावा -बाबासाहेब बोडखे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टयांचा संभ्रम दूर करावा -बाबासाहेब बोडखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण नसलेल्या शाळांना सलग तर सर्वेक्षण पुर्ण केलेल्या शाळांना दिवाळीची सुट्टी 20 नोव्हेंबर पर्यंत म

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने थांबवली
नगरमध्ये इन्कम टॅक्सच्या छापेमारीने चर्चेला उधाण
अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंधसाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना

अहमदनगर (प्रतिनिधी)-

राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण नसलेल्या शाळांना सलग तर सर्वेक्षण पुर्ण केलेल्या शाळांना दिवाळीची सुट्टी 20 नोव्हेंबर पर्यंत मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविले आहे. सध्या राज्यात निर्माण झालेला दिवाळी सुट्टयांचा संभ्रम तातडीने दूर होणे अपेक्षित असून, यासाठी शिक्षक परिषद पाठपुरावा करीत असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण (एनएएस) साठी शाळांची निवड स्थानिक पातळीवर झाली आहे. राज्यातील सर्वच शाळांमध्ये सदर सर्व्हेक्षण होणार नसून, ज्या शाळांमध्ये सर्व्हेक्षण होणार नाही त्या शाळांची दिवाळी सुट्टी कायम ठेवण्यात यावी. शाळांना 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान ज्या शाळेत एनएएस परीक्षा नाही, त्या शाळेत मुलेही येतील असे वाटत नाही. ज्या शाळांनी दोन दिवसीय सर्व्हेक्षण पुर्ण केले. अशा शाळांना सर्व्हेक्षणानंतर दिवाळीची सुट्टी मिळणे अपेक्षित आहे. कोरोना काळात इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू आहेत. शाळेत कोरोनाचे संकट कायम असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सर्व्हेक्षण नसलेल्या शाळांना सलग तर सर्वेक्षण पुर्ण केलेल्या शाळांना दिवाळीची सुट्टी 20 नोव्हेंबर पर्यंत मिळण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

COMMENTS