योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक नोंदणी करणे आवश्यक- नंदकुमार गव्हाणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक नोंदणी करणे आवश्यक- नंदकुमार गव्हाणे

जामखेड प्रतिनिधी   ई-पीक पाहणी व नोंदणी मुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही  सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई

वीज तोडण्याच्या कारवाईविरोधात आंदोलन पवित्रा
कोपरगावकरानो आता तरी बदला- देसले
श्रीरामपूरात पहिल्यांदा कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे एकत्रित शिबीर

जामखेड प्रतिनिधी
   ई-पीक पाहणी व नोंदणी मुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही  सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल याचबरोबर खरेदी केंद्रावर माल घालण्यासाठी व विविध शासकीय योजनांआचा लाभ घेण्यासाठी ई पीक नोंदणी आवश्यक आहे असे मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी सांगितले.        

साकत येथे मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी ई पीक नोंदणी बाबत शेतकर्‍यांना माहिती दिली व प्रत्यक्ष शेतावर जाऊन नोंदणी केली. यावेळी मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे, तलाठी सचिन खेत्रे, माजी सरपंच हरीभाऊ मुरुमकर, पोलीस पाटील महादेव वराट, प्रा.पाडुंरंग वराट, बाळासाहेब वराट, सचिन मुरुमकर, बिभिषण वराट, सतिश लहाने, रामहारी वराट, अजय अडसुळ, दत्तात्रय वराट दगडू वराट, पांडुरंग वराट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.   

यावेळी बोलताना गव्हाणे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ,अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे ई पीक पाहणी अँपवर शक्य होते. दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये निर्मिती केली असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

हा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून राज्यभर राबवण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. या पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल, असेही मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी सांगितले

COMMENTS