देशमुख यांच्यारीवल आरोपांची चांदीवाल करणार चौकशी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशमुख यांच्यारीवल आरोपांची चांदीवाल करणार चौकशी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आणि खळबळजनक आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने एक सदस्यीय उत्त स्तरीय चौकशी समिती नेमली आहे.

लोहा शहरातुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग बनला चिखलमय पांदण रस्ताखड्ड्यामुळे नागरिक त्रस्त
उन्हाळ्याच्या दिवसात अशी घ्या त्वचेची काळजी
solapur:महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयात गुरा ढोरांसहित आंदोलन | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आणि खळबळजनक आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने एक सदस्यीय उत्त स्तरीय चौकशी समिती नेमली आहे. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने आपला अहवाल येत्या सहा महिन्यांमध्ये शासनाला सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. 

सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना २० मार्च २०२१ रोजी गृहमंत्री देशमुखांवर आरोप करणारे पत्र लिहिले. त्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे देशमुख यांनी किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याचे निष्पन्न होईल, असा काही पुरावा सिंह यांनी त्यांच्या पत्रात सादर केला आहे का, याबाबत ही समिती चौकशी करेल. या बरोबरच सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून प्राप्त झालेल्या तथाकथितम माहितीच्या आधारे सिंह यांची बदली झाल्यानंतर गृहमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एखादा गुन्हा केल्याचे निष्पन्न होते का, याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तसे असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत किंवा इतर तपास यंत्रणांमार्फत ते तपासण्याची आवश्यकता आहे का, याबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.

COMMENTS