Homeताज्या बातम्या

घरकोंबड्या सरकारमुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार-

भाजप महिला मोर्चाच्या वतीनं राज्यातील विविध शहरांमध्ये ‘साकडं आंदोलन’ केलं जाईल, अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी यांन

नवी मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाला चोपले
महाराष्ट्राची ऐतिहासिक विजयगाथा; जनादेशाचा सन्मान – श्री. शांत प्रकाशजी जाटव
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात नांदेडमध्ये भाजपकडून जाहीर निषेध

भाजप महिला मोर्चाच्या वतीनं राज्यातील विविध शहरांमध्ये ‘साकडं आंदोलन’ केलं जाईल, अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी यांनी दिली आहे. संकटास घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरूये. सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत राहिलेली नाही. सविता कुलकर्णी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महिलांचा सन्माम राखण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत आहे. महिलांना मंत्रिमंडळात मानाचं स्थान मिळत आहे. तर इकडे राज्यात मात्र, ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे महिलांवर अत्याचारांचा कळस गाठला आहे, अशी टीका त्यांनी केलीये.

COMMENTS