Homeताज्या बातम्याक्रीडा

फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला

ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला फॅमिली इमर्जन्सीमुळे भारतात परतावे लागले. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी तो पुन्ह

गिल, कोहलीचे श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक
या दिग्गज क्रिक्रेटपटूची विमा कंपनी लवकरच बाजारात
विराटला बर्थडे सरप्राईज देणाऱ्या अनुष्कासोबत घडलं भलतंच

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला फॅमिली इमर्जन्सीमुळे भारतात परतावे लागले. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी तो पुन्हा संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. इंडिया टुडेच्या नितीन कुमार श्रीवास्तवच्या वृत्तानुसार, कौटुंबिक कारणांमुळे कोहलीला भारतात परतावे लागले. संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय या दोघांकडून मंजुरी मिळाल्यानंतर कोहली तीन दिवसांपूर्वी मुंबईला रवाना झाला. कोहलीला भारतीय खेळाडूंसोबत सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात भाग घ्यायचा होता. मात्र फॅमिली इमर्जन्सीमुळे त्याला भारतात परतावे लागले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पांढऱ्या चेंडू क्रिकेट मालिकेदरम्यान कोहलीला ब्रेक देण्यात आला होता. ज्यामध्ये भारताला तीन सामन्यांची T-20 मालिका खेळायची होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामनेही खेळवले जाणार होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. गेल्या गुरुवारी पारल येथील बोलंड पार्क येथे झालेल्या निर्णायक सामन्यात संजू सॅमसनच्या पहिल्या शतकाच्या जोरावर भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली. गोलंदाज अर्शदीप सिंग या मालिकेत 10 विकेट्स घेऊन सर्वोत्कृष्ट ठरला. त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

भारताला दक्षिण आफ्रिकेसोबत दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. तो सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी 2024 पासून जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल.

COMMENTS