Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजभवनात ‘वंदे मातरम्’चे सूर निनादले

मुंबई, दि.७ : बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीताचे 

पंतप्रधान मोदींनी केली 41 हजार कोटींच्या प्रकल्पाची घोषणा
बालाजी रोहिलावार यांच्या देशी- विदेशी दारूच्या दुकानाची राज्य उत्पादन विभागाकडे तक्रार
वडिलांच्या मृत्यूनंतर लेकीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, दि.७ : बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीताचे  सामूहिक गायन करण्यात आले.

राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी ‘वंदे मातरम्’चे  सामूहिक गायन केले.

सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या  ‘वंदे मातरम् ‘ या गीतास दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने राजभवन येथे ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

COMMENTS