Homeताज्या बातम्या

सोलापूरात उजनीचा कालवा फुटला

शेकडो एकर शेती गेली पाण्याखाली

सोलापूर/प्रतिनिधी ः सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. रविवारी पहाटेच ही घटना घडली. पाटकुल गावात

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकाचा मार्ग मोकळा; संगमनेर नगरपालिकेच्या सभेत ठराव मंजूर
 कांद्याला भाव द्या ; शेतकऱ्यांची आर्त हाक
ज्ञानाई – तुकाई गुरुकुल आष्टी येथे भव्य बालसंस्कार शिबीर संपन्न

सोलापूर/प्रतिनिधी ः सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. रविवारी पहाटेच ही घटना घडली. पाटकुल गावातील उजनीचा कालवा फुटल्याने शेकडो एकरमधील शेती पाण्याखाली गेली आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकर्‍यांची पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. शेतकर्‍यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. जवळपास 112 किलोमीटर लांब असलेला हा कालवा रविवारी पहाटे अजानक पाटकुल गावात फुटला. त्यामुळे पाण्याचा मोठा ओढा शेतकर्‍यांच्या शेतात वाहू लागला. पाटकुल गावातील शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसला आहे. या शेतकर्‍यांची डाळिंब, ऊसासह जवळपास सर्वच पिके पाण्याखाली गेली आहेत. गावातील जवळपास सर्व द्राक्ष बागा पाण्याखाली गेल्या आहेत. गावातील शेतांमध्ये आता केवळ पाणी साचले आहे. कालवा फुटला कसा काय? हे अजून समजू शकले नाही. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

COMMENTS