Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसईजवळील अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांना जागीच मृत्यू झाला आहेत. तर दोन जण गंभीर ज

राष्ट्रीय महामार्ग 361 फ खरवंडी ते नवगण राजुरी वर ब्रम्हनाथ येळम शिवारात भीषण अपघात एक जण जागीच ठार
समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू
नगर-मनमाड महामार्गावर अपघात ; तरुण ठार 

मुंबई ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांना जागीच मृत्यू झाला आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना वसई सतीवली बजरंग हॉटेलसमोर हा अपघात झाला आहे. कार चालकाचा ताबा सुटला आणि त्यानंतर कार डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकवर धडकली. या अपघातात चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी वसई पोलीस दाखल झाले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

COMMENTS