Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’५० खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही 

५0 खोके सत्ताधाऱ्यांनी कसे नेले, याचा विरोधकांनी हिशेब द्यावा

नंदुरबार प्रतिनिधी  - ’५० खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही. ठाकरे गटाचा हा घाव शिंदे गटाच्या चांगलाच वर्मी

नेप्ती फाट्यावर संतप्त शेतकरी ग्रामस्थांचा भारनियमन विरोधात रास्ता रोको
भाजप पक्षात घराणेशाहीला स्थान नाही : निशिकांत भोसले-पाटील
न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांचे धरणे

नंदुरबार प्रतिनिधी  – ’५० खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही. ठाकरे गटाचा हा घाव शिंदे गटाच्या चांगलाच वर्मी लागला आहे. विरोधकांनी ५० खोक्यावरुन टार्गेट केलेलं असताना राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, पश्चिम बंगालमधील एका मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीकडे २७ कोटी रुपये सापडले होते. मग ५० खोके नेण्यासाठी एक ट्रक तर लागेल असा पलटवार गुलाबरावांनी केला. त्यामुळे आता विरोधकांना ५० खोके सत्ताधाऱ्यांनी कसे नेले, याचा हिशेब तर द्यावाच लागेल, नाही का?

COMMENTS