Homeताज्या बातम्या

’५० खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही 

५0 खोके सत्ताधाऱ्यांनी कसे नेले, याचा विरोधकांनी हिशेब द्यावा

नंदुरबार प्रतिनिधी  - ’५० खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही. ठाकरे गटाचा हा घाव शिंदे गटाच्या चांगलाच वर्मी

देशात व राज्यात परिवर्तनाची लाटः आकाश नागरे
मुक्त विद्यापीठात पशुसंवर्धन विषयक तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन 
विरोधी पक्ष सत्तेसाठी हपापलेले – विठ्ठल पवार राजे

नंदुरबार प्रतिनिधी  – ’५० खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही. ठाकरे गटाचा हा घाव शिंदे गटाच्या चांगलाच वर्मी लागला आहे. विरोधकांनी ५० खोक्यावरुन टार्गेट केलेलं असताना राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, पश्चिम बंगालमधील एका मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीकडे २७ कोटी रुपये सापडले होते. मग ५० खोके नेण्यासाठी एक ट्रक तर लागेल असा पलटवार गुलाबरावांनी केला. त्यामुळे आता विरोधकांना ५० खोके सत्ताधाऱ्यांनी कसे नेले, याचा हिशेब तर द्यावाच लागेल, नाही का?

COMMENTS