बीडमध्ये अतिरिक्त उसाचा पहिला बळी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये अतिरिक्त उसाचा पहिला बळी

उस पेटवून देत शेतकर्‍याने गळफास घेत केली आत्महत्या

बीड : राज्यात अनेक कारखान्यांनी उसाचे गाळप बंद केल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतात उभा असलेल्या ऊसाचे करायचे काय, हा प्रश्‍न ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सताव

घोटी-सिन्नर महामार्गावर धामणगांव येथे अपघात
कोकणच्या‘पीएमएवाय’साठी सहा लाख उत्पन्नांची मर्यादा
फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेता आकाश पाटील नुकताच विवाह बंधनात अडकला

बीड : राज्यात अनेक कारखान्यांनी उसाचे गाळप बंद केल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतात उभा असलेल्या ऊसाचे करायचे काय, हा प्रश्‍न ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सतावत असतांनाच, बीड जिल्ह्यामध्ये एका शेतकर्‍यांने अगोदर ऊस पेटवून देत नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्‍न गंभीर बनतांना दिसून येत आहे.
ऊस तोडणीला आला आहे, मात्र कारखाना ऊस घेऊन जात नसल्यामुळे बीडमधील 30 वर्षीय तरूण शेतकर्‍यांने ऊस पेटवून दिला. इतकेच नाही तर त्यानंतर ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन या शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना, बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये घडली आहे. नामदेव आसाराम जाधव रा. हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड असं गळफास घेतलेल्या शेतकर्‍याचं नाव आहे. नामदेव जाधव यांना एकूण 2 एकर शेती असून त्यांनी शेतामध्ये 265 जातीचा ऊस लागवड केला होता. त्यासाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र हा ऊस आता तोडणीला येऊन देखील, परिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून ऊस घेऊन जाण्यासाठी, नामदेव जाधव हे कारखान्याकडे चकरा मारत होते. मात्र त्यांना कारखान्याकडून निराशाच मिळाली, यामुळे नैराश्यात आलेल्या आसाराम जाधव यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी ऊसाच्या फडाला पेटवून देत, फडातिलच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्‍न गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनला असून जवळपास 30 ते 40 हजार मेट्रिक टन ऊस अद्यापही बीड जिल्हा शिल्लक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे एकीकडे अतिरिक्त उसाचा प्रश्‍न गंभीर बनला असताना देखील कारखानदार मात्र मनमानीपणा करत आहेत. परजिल्ह्यातील ऊस आयात करत आहेत. यामुळे तळहाताच्या फोडा सारखा जपलेला ऊस कुठे घालावा ? असा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला. त्यामुळे आता संतप्त आणि हताश झालेल्या शेतकर्‍यांकडून, टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झाले. त्यामुळे आता साखर आयुक्त आणि सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. उसाचे क्षेत्र या वर्षी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने यावर्षी आपल्याला चांगला पैसा मिळेल अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी बाळगून होता. पण कारखानदार आणि शेतकरी यांच्यात संवाद नसल्याने उसाचे हजार हेक्टर क्षेत्र अजूनही तोडणी विना उभे आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे.

COMMENTS