Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री विखे आणि थोरातांची राजकीय मिलीभगत

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची टीका

बेलापूर प्रतिनिधी ः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची छुपी युती असून ते मिलीभगत करुन सत्ता मिळवतात, आणि इतरा

पांडुरंग किसन खेतमाळीस यांचे निधन
करंजी परिसराला वादळी वार्‍यांसह गारांचा फटका
Pathardi : अतिवृष्टीने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त | Lok News24

बेलापूर प्रतिनिधी ः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची छुपी युती असून ते मिलीभगत करुन सत्ता मिळवतात, आणि इतरांवर अन्याय करतात. ज्या थोरातांनी मंत्री असतांना सन 2005 मध्ये समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याचे विधेयक विधानपरिषदेत मांडले तेच आता दिशाभूल करीत आहेत. भंडारदर्‍याची पाणी आपल्या भागाला मिळण्यासाठी वेळप्रसंगी लढा व आंदोलने करावी लागतील. त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविली पाहिजे. भंडारदर्‍याचे पाणी आधी निळवंडेत येते. त्यामुळे या पाण्याचा अकोले व संगमनेर भागात गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वांना जागरुक राहावे लागेल. गणेश कारखान्याप्रमाणेच प्रवरा व संगमनेर कारखान्याने ‘अशोक’ च्या कार्यक्षेत्रातून ऊस नेवू नये, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

    अशोक कारखान्याची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर होऊन पार पडली. त्यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरुन श्री.मुरकुटे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, सौ.इंदूताई डावखर, ज्ञानदेव साळुंके, सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, सौ.सुनिताताई गायकवाड, सौ.शालिनीताई कोलते, हनुमंतराव वाकचौरे, हिम्मतराव धुमाळ, सचिन गुजर, अ‍ॅड.सुभाष चौधरी, सुधीर नवले, बापुराव त्रिभुवन, काशिनाथ गोराणे, बाबासाहेब ढोकचौळे, भाऊसाहेब उंडे, दत्तात्रय नाईक, रामदास पटारे, भाऊसाहेब हाळनोर, सखाराम कांगुणे आदी उपस्थित होते. मुरकुटे आपल्या भाषणात म्हणाले की, निळवंडेच्या पाण्याचा अकोले, संगमनेर, राहाता व कोपरगाव तालुक्यातील काही गावांना फायदा होईल. श्रीरामपूर व नेवासा तालुक्याला आणि उर्वरित राहुरी तालुक्याला काहीच लाभ व फायदा नाही. पुढच्या पिढ्यांच्या हितरक्षणासाठी पाटपाण्याबाबत दक्ष राहावे लागेल. सभासदांचा आपल्यावर विश्‍वास असल्याने 35 वर्षे आमच्याकडे कारखान्याची सूत्रे दिलेली आहे. आम्हीही 100कोटींचा इथेनॉल प्रकल्प, 100 कोटींचा डिस्टीलरी प्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्प यासह पॉलिटेक्निक,डी, फार्मसी व महाविद्यालय, आय.टी.आय. व दोन स्कूल्स् असे शिक्षण संकूल उभे केले. त्याबद्दल आरोप करणारे शब्दभरही बोलत नाहीत. जेवढे उत्पन्न सर्व मार्गाने मिळते त्यातून खर्च वजा जाता सभासदांना भावाच्या दराचे वाटप केले जाते. जिल्ह्यातील काही कारखान्यांकडे उपपदार्थ, वीजनिर्मिती प्रकल्प असताना कमी भाव देतात. त्यासंदर्भात जाणिवपूर्वक माहिती दिली जात नाही. वृध्देश्‍वर (रु.2,500), मुळा (रु.2,450), प्रवरा (रु.2,344), ज्ञानेश्‍वर (रु.2,400) तर अशोक रुपये 2,573 असा भाव दिला. त्याबद्दल कौतुक नाही. अनेक कारखाने बाहेरुन ऊस आणतात. त्यांना वेगळा व  कमी भाव देतात. आपण असा दुजाभाव करीत नाही. याबाबत बोलण्याची दानत टीका करणारे दाखवित नाहीत. शासनाने शेतकर्‍यांना कबूल केलेले विविध अनुदाने अद्यापही दिले नाही. तसेच पाणी पट्टीतही तब्बल तीन पटीने वाढ केली आहे. यासंदर्भातही शेतकर्‍यांचे नेते अवाक्षरही काढीत नाही.  ‘अशोक’ वर टीका करणारे, आंदोलने करणार्‍यांमध्ये इतर कारखान्यांंवर जाऊन आंदोलन करण्याची हिम्मत नाही, असे मुरकुटे यांनी खडसावले.

COMMENTS