Homeताज्या बातम्या

 नवी मुंबईत निर्माण होत आहेत कबुतरखाने ; नागरिक त्रस्त

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईत कबुतरखाने मोठ्या प्रमाणात तयार होताना दिसत आहेत. मुख्य रस्त्यांवर अनेकजण कबुतरांना खाद्य टाकून कबुतरे जमा करतान

‘प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल’ : नाना पटोले | LOKNews24
सर्व प्रश्नाची चर्चा या आठवड्यात व्हावी अशी अपेक्षा विरोधी पक्ष नेते म्हणुन सत्ताधाऱ्यांना आहे – सचिन अहिर  
शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून हजारो छावाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार- करण गायकर

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईत कबुतरखाने मोठ्या प्रमाणात तयार होताना दिसत आहेत. मुख्य रस्त्यांवर अनेकजण कबुतरांना खाद्य टाकून कबुतरे जमा करतानाचे चित्र आहे. ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावर कबुतरांची मोठी वर्दळ आसल्याने अपघात होण्याची शक्यता असते. अंधश्रद्धेचा भाग म्हणूनही काहीजण कबुतरांना खाद्य टाकतात, हेच कबुतर जवळच्या इमारतीत आपले घर बनवतात आणि त्यातून रोगाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे हे कबुतरखाने बंद व्हावेत म्हणून अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून पालिकेने अजून काहीच उपाययोजना केल्याचे दिसत नाही. पालिकेने याबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी तक्रारदार योगेश चव्हाण यांनी केली.

COMMENTS