Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाळ्यात नदी व खाडी किनाऱ्यावर नैसर्गिक आपत्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलिसांचे मॉकड्रील

  कल्याण प्रतिनिधी - कल्याण मध्ये उल्हास नदी , काळू नदी व इतर खाडीचे पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात अन

सातारच्या मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेस परवानगी; 100 विद्यार्थ्यांना मिळणार एमबीबीएसला प्रवेश
शांततापूर्ण आंदोलन करणे घटनात्मक अधिकार; लाठीमार करणे अयोग्य: सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये  छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे मोठे योगदान – -पी-व्ही बनसोडे

  कल्याण प्रतिनिधी – कल्याण मध्ये उल्हास नदी , काळू नदी व इतर खाडीचे पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे दुर्घटना घडली तर ती परिस्थिती हाताळण्यासाठी कल्याण पोलिसांनी व इतर अस्थपणाने कमर कसली असून कल्याण नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, बाजारपेठ व खडकपाडा पोलिस, अग्निशमन दल यांच्यावतीने मॉकड्रिल घेण्यात आले. कल्याण च्या गणेश घाट परिसरात काळू नदीच्या किनाऱ्यावर हे मॉकड्रिल करण्यात आले. या मॉकड्रिल दरम्यान आपातकालीन परिस्थितीत बचाव कार्य कसे करायचे? प्राथमिकरित्या काय करायचे? नागरिकांचे प्राण कसे वाचवायचे? रुग्णालयात एखाद्या व्यक्तीस कशा पद्धतीने पोहचवला पाहिजे ,खाडी किनारा परीसरात पावसाळ्यात अटीतटीची परिस्थिती ओढवते. अशा स्थितीत जास्तीत जास्त लोकांचं बचावकार्य कसे पार पाडता येईल याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आले.

COMMENTS