HomeUncategorized

एकत्र लढलो असतो तर सत्ता आली असती : ना. जयंत पाटील

कडेगाव नगरपंचायतीनिमित्ताने काँग्रेसवर टीकाकडेगांव / प्रतिनिधी : महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेलो असतो तर कडेगाव नगरपंचायतीम

कराड-पाटण मार्गावर स्कॉपिओ-टेम्पो धडक; स्कॉपिओ चालक गंभीर
मनेका गांधी जीवदया निर्मल हॉस्पिटल उभारणीचा पंचनामा
निसर्गानुभव कार्यक्रमात निसर्गप्रेमींना 374 वन्यप्राण्यांचे दर्शन

कडेगाव नगरपंचायतीनिमित्ताने काँग्रेसवर टीका
कडेगांव / प्रतिनिधी : महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेलो असतो तर कडेगाव नगरपंचायतीमधील सत्ता आली असती असा टोला पालकमंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसला लगावला. ते देवराष्ट्रे येथे स्व. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
ना. जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून आमची प्रमाणिकपणे एकत्र काम करण्याची इच्छा आहे. कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी असती तर चित्र वेगळे दिसले असते. नुकत्याच झालेल्या कडेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपने 11 जागी विजय मिळवत येथील कॉग्रेसची सत्ता ऊलथवुन टाकली. काँग्रेसला केवळ पाच जागावर विजय मिळवता आला. राष्ट्रवादीने एक जागा मिळवत आपले खाते खोलले आहे.

COMMENTS