Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुषमा अंधारे यांच्या मेंदूला नारू झालाय काय ?

प्रकाश महाजन यांनी एकेरी उल्लेख करत केली टीका

पुणे प्रतिनिधी - राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे या आक्रमकपणे शिवसेनेचा किल्ला लढवतांना दिसून येत आहे. नारायण राणे, शिंदे गटातील

सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार
सुषमा अंधारेंचा गुलाबरावांवर मिश्किल टोला
वारकर्‍यांच्या संतापानंतर सुषमा अंधारेंची माफी

पुणे प्रतिनिधी – राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे या आक्रमकपणे शिवसेनेचा किल्ला लढवतांना दिसून येत आहे. नारायण राणे, शिंदे गटातील आमदार, राज ठाकरे यांच्यावर त्या सडकून टीका करतांना दिसून येत आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. इतकच नाही तर मीडियाशी संवाद साधताना महाजन यांनी सुषमा अंधारे यांचा एकेरी उल्लेखही केला आहे. सुषमा अंधारे काहीही बोलते. तिच्या मेंदूला काय नारू झालाय का? असा संतप्त सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे.
कालच तिची सभा झाली.. इतके वर्ष महापालिकेत सत्ता असून मातोश्रीचा मजला चढला नाही. पण कृष्णकुंजचा मजला चढला, असं ती म्हणाली. हे बोलण्याआधी तिने आपल्या मालकाला विचारायला हवे ना. मी असे बोलू की नको हे विचारले पाहिजे ना? असा सवालही त्यांनी केला. सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंना लवकरच महिलांच्या बंडाला सामोरे जावे लागणार आहे, अशी टीका करतानाच काल परवा मुसलमान झाल्यासारखे सुषमा अंधारे आदाब आदाब करत फिरतायत, असा हल्लाही त्यांनी चढवला. मातोश्री-2 कशी झाली ते सांगावे? उद्धव ठाकरेंना सवाल करावा, असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांना पुत्रमोह आडवा येतोय, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यावरही त्यांनी टीका केली. सुषमा अंधारेना पुत्रमोह होऊ शकत नाही, कारण त्यांची वेगळी अडचण आहे, असे महाजन म्हणाले. तुमचे नेते पहाटेच भाजपच्या पाणवठ्यावर गेले होते, त्यांनाच विचारा असा टोला त्यांनी रुपाली पाटलांना एका प्रश्‍नाला उत्तर देताना लगावला. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीयवादी राजकारण सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पलटवार केला आहे. राज ठाकरे यांचे आरोप हस्यास्पद आहेत. त्यात तसूभरही तथ्य नाही. नखभरही तथ्य नाही, असे अजित पवार म्हणाले होते. अजित पवार यांच्या या विधानावरही महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुम्ही जातीयवादी नाही तर राष्ट्रवादीने सप्रमाण दाखवून द्यावे. त्यांच्या पक्षात विशिष्ट जातीची लोकं आहेत. त्यांचेच वर्चस्व आहे. हे दिसून येते. हातच्या कंगनाला आरसा कशाला पाहिजे? असे ही महाजन म्हणाले

तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही – सुषमा अंधारे यांनी कालच्या मुलुंड येथील सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर महाजन बोलत होते. सुषमा अंधारेंची सभा कालच झाली. या बाईला काय बोलावं? मी बीड जिल्ह्यातील आहे. तीही बीड जिल्ह्यातील आहे. तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदूला नारू झाला की काय तिच्या. काय बोलली ती? असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला.

COMMENTS