Homeताज्या बातम्या

गिल, कोहलीचे श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारत आणि श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने जिंकली असली तरी, तिसर्‍या एकदिवसीय सामना भारतीय फ

विराट-अनुष्का अलिबागमध्ये बांधणार आलिशान फार्महाऊस
टीम इंडियाला आशिया कपमधील सुपर फोरमधील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
गौतम गंभीर आणि विराट कोहली मैदानातच भिडले

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारत आणि श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने जिंकली असली तरी, तिसर्‍या एकदिवसीय सामना भारतीय फलंदाजीने गाजवल्याचे दिसून आले. भारतीय फलंदाजांनी लंकन गोलंदाजांची जोरदार धुलाई करत 50 षटकात 5 बाद 390 धावा  करत श्रीलंकेसमोर 391 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सलामवीर शुभमन गिल पाठोपाठ विराट कोहलीनेही आपले शतक पूर्ण शतक केले आहे. विराटचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दितील 74 वे आणि 46 वे एकदिवसीय शतक ठरले. कोहली 110 चेंडूत 166 धावांची शतकी खेळी करून नाबाद राहिला. त्याच्या या शतकी खेळीत 13 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश राहिला. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीच्या बॅटने पुन्हा धावांचा पाऊस पाडण्यास सुरूवात केली आहे.

COMMENTS