शिर्के पाटलांच्या घरात साजरं होणार गौरीचं डोहाळे जेवण

Homeताज्या बातम्या

शिर्के पाटलांच्या घरात साजरं होणार गौरीचं डोहाळे जेवण

स्टार प्रवाह वरील 'सुख म्हणजे काय असतं' मालिकेत सध्या सगळं वातावरण चांगलं आहे. गौरी(Gauri) आणि जयदीप(Jaideep) यांचा सुखाचा संसार चालू असला तरी शालिनी

मैत्रीण आमच्याशी न बोलता तुझ्याशीच बोलते, म्हणून तरुणाचा खून l
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ड्रोन कार्यशाळेचास उत्स्फूर्त प्रतिसाद
नामांकित हॉटेलमध्ये बसून दिली क्लास वन अधिकाऱ्याची परीक्षा

स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेत सध्या सगळं वातावरण चांगलं आहे. गौरी(Gauri) आणि जयदीप(Jaideep) यांचा सुखाचा संसार चालू असला तरी शालिनी त्यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करते. गौरी आणि जयदीप यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी ती सतत काही ना गोष्टी धडवून आणत असते. पण ही  दोघे सगळ्या संकटांचा सामना करतात. पण आता दोघांमध्ये तिसरा पाहुणा  येणार आहे. सध्या गौरी गरोदर आहे. त्यामुळॆ घरात आनंदाचं वातावरण आहे. आता लकरच शिर्के पाटलांच्या घरी गौरीचं डोहाळेजेवण साजरं होणार आहे. गौरीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात गौरी ज्या झोपाळ्यावर बसलेली असते तोच निसटतो आणि गौरी त्यावरून खाली पडते. हे बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो.

COMMENTS