Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमधील दोघांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक

इम्फाळ ः मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने 4 जणांना अटक केली. सीबीआयने या आरोपींना चुराचांदपूर येथून अटक केली. तपास यंत्रणेन

ऊसतोड कामगारांची नोंदणी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण करण्याचे आवाहन
दहावीत कमी गुण पडतील या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या | LOK News 24
शेजारच्याने गळफास घेतल्याचे पाहून चिमुकल्याने ही घेतला गळफास I LOKNews24

इम्फाळ ः मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने 4 जणांना अटक केली. सीबीआयने या आरोपींना चुराचांदपूर येथून अटक केली. तपास यंत्रणेने सर्व आरोपींना आसाम येथील गुवाहाटी येथे नेले आहे. दरम्यान यापूर्वी माहिती आली होती, 6 आरोपींना विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. त्यापैकी 2 जण अल्पवयीन आहेत. पण नंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणी 4 आरोपी पकडण्यात आले आहे. सीबीआयने आता अटक सत्र चालवले असून आतापर्यंत 4जणांना अटक करण्यात आली आहे.

COMMENTS