गुवाहाटी: आसाममध्ये शनिवारी सकाळी मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची घटना घडली आहे. पहाटे ४:५१:१६ वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणव

गुवाहाटी: आसाममध्ये शनिवारी सकाळी मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची घटना घडली आहे. पहाटे ४:५१:१६ वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. भारतीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार (NCS), या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ इतकी मोजली गेली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील कचार जिल्ह्यात जमिनीखाली सुमारे ४२ किलोमीटर खोलीवर होता. तसेच भूकंपाच्या केंद्रबिंदूची नोंद २४.९४ उत्तर अक्षांश आणि ९२.५६ पूर्व रेखांशावर झाली आहे. पहाटेच्या वेळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घाबरून घराबाहेर धावले.
सुदैवाने, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासन सध्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS