Homeताज्या बातम्या

राजकीय वैमनस्यातून नराधमांनी आख्ख्या कुटुंबाला संपवलं  

आरोपींनी जिल्हा परिषद सदस्यासह त्याची आई आणि पत्नीवर गोळीबार केला या गोळीबारानंतर आरोपी दुचाकीने पळून गेले

उत्तर प्रदेश प्रतिनिधी  - समाजवादी पक्षाचे नेता आणि जिल्हा परिषद सदस्य राकेश गुप्ता(Rakesh Gupta) यांच्या  घरात काही नराधमांनी गोळीबार केल्याची

आईच्या वर्षश्राद्धातील पाचशे रुपयांची उधारी देण्यावरून भावांमध्ये वादविवाद
पत्नीचा गळा चिरला, मग उकळते तेल टाकले; चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या
बिहारमध्ये जमिनीच्या वादातून दोघांची हत्या

उत्तर प्रदेश प्रतिनिधी  – समाजवादी पक्षाचे नेता आणि जिल्हा परिषद सदस्य राकेश गुप्ता(Rakesh Gupta) यांच्या  घरात काही नराधमांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी जिल्हा परिषद सदस्यासह त्याची आई आणि पत्नीवर गोळीबार केला. या गोळीबारानंतर आरोपी दुचाकीने पळून गेले. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले.पोलिसांनी तीनही मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांच्या माहितीनुसार राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशच्या बदायू येथील सथरा गावात घडली आहे.

COMMENTS