Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईच्या 99 वर्ष जुन्या गेट वे ऑफ इंडियाच्या भिंतीला तडे

मुंबई : मुंबईत अरबी समुद्राच्या किनार्‍यावर ‘गेटवे ऑफ इंडिया’ हे भारताचे प्रवेशद्वार (समुद्रमार्गे) मोठ्या दिमाखात उभे आहे. गेल्या 99 वर्षांपासून

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा सार्थ अभिमान आहे-मुर्गाप्पा खुमसे
मुंबईत 25 वर्षीय एअर होस्टेसची निर्घृण हत्या
तू फक्त नगरला ये, तुझा दरबार उधळून लावू

मुंबई : मुंबईत अरबी समुद्राच्या किनार्‍यावर ‘गेटवे ऑफ इंडिया’ हे भारताचे प्रवेशद्वार (समुद्रमार्गे) मोठ्या दिमाखात उभे आहे. गेल्या 99 वर्षांपासून ही वास्तू मुंबईकर आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गेली 99 वर्षे ही वास्तू समुद्राच्या लाटांचा सामना करत दिमाखात उभी आहे. परंतु नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की, या वास्तूच्या भिंतीला तडे गेले आहेत.

गेटवे ऑफ इंडियाच्या भिंतीला तडे गेले आहेत. असे सांगण्यात येत आहे की, या वास्तूच्या स्ट्रक्चरल ऑडिटदरम्यान वास्तूच्या भिंतीला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, आता सरकार या वास्तूच्या जीर्णोद्धाराचा प्रस्ताव स्वीकारेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेटवे ऑफ इंडिया केवळ मुंबईचीच नव्हे तर संपूर्ण देशाची ओळख आहे. इंग्रजांनी 1911 साली या वास्तूचेे बांधकाम सुरू केले. 1924 मध्ये गेटवे ऑफ इंडियाची इमारत उभी राहिली. 4 डिसेंबर 1924 पासून ही वास्तू सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. या 99 वर्षे जुन्या संरचनेला आता तडे जाऊ लागले आहेत. मुंबईच्या अरबी समुद्रात जेव्हा एखादे चक्रीवादळ येते तेव्हा समुद्राच्या उंच लाटांचा गेटवेला तडाखा बसतो. परंतु आतापर्यंत अनेक चक्रीवादळांना तोंड दिल्यानंतरही गेटवेची वास्तू दिमाखात उभी आहे. परंतु गेल्या वर्षी आलेल्या चक्रीवादळात या संरचनेचे नुकसान झाले होते. गेल्या आठवड्यात ही बाब सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आता गेटवेच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलिकडेच गेटवेचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटनुसार इमारतीच्या दर्शनी भागात भेगा पडल्या होत्या. तसेच इमारतीच्या अनेक भागात छोटी रोपे उगवली असल्याचे पाहायला मिळाले. तसेच गेटवेच्या घुमटावरील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचे देखील नुकसान झाले आहे. त्यानंतर राज्याच्या पुरातत्व विभागाने गेटवेच्या नूतनीकरणासाठी 6.9 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, जो अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

COMMENTS