Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतल्या पाणीपट्टी दरवाढीला भाजपचा विरोध

16 जूनपासून निर्णय लागू करण्याची प्रशासनाची तयारी

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेल्या पाणीपट्टी दरवाढीला भाजपने विरोध केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी या द

कराडला शोभायात्रेने विजय दिवस समारोहास प्रारंभ
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
पाडव्याच्या खरेदीला उसळळी गर्दी ; कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेल्या पाणीपट्टी दरवाढीला भाजपने विरोध केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी या दरवाढीला विरोध असल्याचे सांगितले. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका आहेत. त्या तोंडावर ही पाणीपट्टी दरवाढ होणार आहे. हे पाहता भाजपने या निर्णयाला विरोध केल्याचे समजते.
दुसरीकडे राज्य शासनाने आपल्या कोट्यातील अतिरिक्त पाणी साठा मुंबई देण्याचे मान्य केले आहे. त्याबद्दल आशिष शेलार यांनी शिंदे – फडणवीस सरकारचे आभार मानले. मुंबई महापालिकेने 16 जूनपासून पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. लिटरमागे 25 पैसे ते चार रुपयांपर्यंत ही वाढ प्रस्तावित आहे. आमचा या दरवाढीला तीव्र विरोध आहे, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. एकाबाजूला मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देऊन एका हाताने द्यायचे आणि दुसर्‍या बाजूला पाणीपट्टी वाढवून दुसर्‍या हाताने काढून घ्यायचे हे चालणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की, त्यांनी ही पाणीपट्टी वाढ होण्यापासून रोखावी, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईकरांची तहान भागवणार्‍या सातही तलावांमध्ये 4 जून 2023 पर्यंत फक्त 11.76 टक्के म्हणजे 1 लाख 74 हजार दशलक्ष लिटर जलसाठा शिल्लक आहे. यातून पुढील महिनाभर मुंबईकरांची तहान भागू शकेल. पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती ओढवू शकते. पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईला अतिरिक्त पाण्याची गरज भासू शकते. म्हणून राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिकेने सरकारकडे केली होती. तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. 4 जून रोजी सातही धरणात 1 लाख 74 हजार 93 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. यातल्या भातसा धरणातून 75 हजार दशलक्ष पाणी पालिकेले मिळावी अशी मागणी होती. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी चर्चा केली. त्यावेळी आयुक्तांनी सांगितले की, राज्य शासनाने आपला अतिरिक्त पाणी साठा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे याबाबत माध्यमाशी बोलताना आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

COMMENTS