Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षण विभागात भ्रष्टाचाराची बजबजपुरी !

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. सत्यजीत तांबे यांचा घणाघात

मुंबई - शिक्षक भरती घोटाळा, परीक्षामधील पेपरफुटीची प्रकरणे, निकालांमधील दिरंगाई अशा विविध प्रकरणांनी ग्रासलेल्या शिक्षण विभागामधील सावळ्या गोंधळा

जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्‍वास ठेवायचा की नाही?
कुपोषित बालकांसाठी टास्क फोर्स तयार करा
आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची थकीत रक्कम कधी देणार?  

मुंबई – शिक्षक भरती घोटाळा, परीक्षामधील पेपरफुटीची प्रकरणे, निकालांमधील दिरंगाई अशा विविध प्रकरणांनी ग्रासलेल्या शिक्षण विभागामधील सावळ्या गोंधळावर आमदार सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळात ताशेरे ओढले. एकीकडे शिक्षणमंत्री चांगलं काम करत असले, तरी शिक्षण विभाग भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनला आहे, असा घणाघात करत राज्यात घडणाऱ्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणं शिक्षण विभागाशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी सभागृहात केला. शिक्षक, शिक्षण संस्था आणि विद्यार्थी यांच्याशी संबंधित अनेक समस्या प्रलंबित असताना त्यावर या अर्थसंकल्पात काहीच तरतूद नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

आमदार म्हणून निवडून आल्यापासून सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागातील अनेक प्रश्नांना विधिमंडळासह अनेक व्यासपीठांवर वाचा फोडली आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी त्यांनी भाषणादरम्यान शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराची चिरफाड केली. शिक्षणसंस्थांना २०-४०-६० अशा तीन टप्प्यांत अनुदान देणे, थकीत वेतन बिलं देणे, आदी मुद्दे अद्यापही प्रलंबित असून या अर्थसंकल्पात त्यासाठी काहीही तरतूद केली नसल्याचं आ. तांबे यांनी स्पष्ट केलं.

आ. सत्यजीत तांबे यांनी आपल्या भाषणादरम्यान राज्य सरकारने केलेल्या शिक्षक भरतीचं कौतुक केलं. मात्र याच धर्तीवर प्राध्यापकांची पदंही भरणं गरजेचं होतं. राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये ११-१२ वी वर्गाच्या कला शाखा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र त्याबाबत राज्य सरकारकडे काहीच धोरण नाही. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी या अर्थसंकल्पात काहीच तरतूद नाही. ही तरतूद होणं गरजेचं होतं, अशी अपेक्षाही आ. तांबे यांनी व्यक्त केली.

शिक्षणमंत्री चांगले, पण… – आपल्या भाषणादरम्यान आ. सत्यजीत तांबे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यशैलीची तारीफ केली. शिक्षणमंत्री चांगलं काम करत आहेत. पण शिक्षण विभागाचा कारभार अत्यंत अनागोंदीचा झाला आहे. राज्यात जेवढी भ्रष्टाचाराची प्रकरणं निघाली, त्यापैकी बहुतेक शिक्षण विभागाशी संबंधित आहेत. यात शिक्षक भरती घोटाळा, पेपरफुटीचं प्रकरण, निकालांमधील गोंधळ अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. – आ. सत्यजीत तांबे

COMMENTS