…तर, अंधेरी पोटनिवडणूक होणार बिनविरोध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, अंधेरी पोटनिवडणूक होणार बिनविरोध

निवडणूक न लढवण्यासाठी राज ठाकरेंच भाजपला खुले पत्र

मुंबई प्रतिनिधी:- राज्यात अंधेरी पोटनिवडणुकीतील वादंग संपले असून, निवडणुकीला सामौरे जात असतांनाच, मनसेप्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी भाजपला

संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी | LOKNews24
भाजप पुन्हा मविआडीला देणार धक्के ?
सकल मराठा समाजाकडून ठाणे बंदची हाक

मुंबई प्रतिनिधी:- राज्यात अंधेरी पोटनिवडणुकीतील वादंग संपले असून, निवडणुकीला सामौरे जात असतांनाच, मनसेप्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी भाजपला खुले पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे. भाजपने राज ठाकरेंची विनंती मान्य केल्यास, ठाकरे गटाचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे.’रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं, अशी विनंती राज ठाकरे यांनी फडणवीस यांना केली. मी आमच्या पक्षातर्फे परिस्थितीत दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसे करावे असे मला माझे मन सांगते. असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे, आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेते आशिष शेलार यांनी रविवारी सकाळी भेट घेतली. बीसीसीआय खजिनदार झाल्यानंतर आशिष शेलार यांनी पहिल्यांदाच राज ठाकरे यांची भेट घेतली. भाजपकडून मुंबई महापालिकेची जबाबदारी आशिष शेलारांवर दिली आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ही भेट महत्वाची आहे.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विचार करणार :- फडणवीस
यासंदर्भात भाष्य करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) म्हणाले की, राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने पत्र लिहिले आहे. त्याबाबत नक्की विचार करू. मात्र, पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा करावी लागेल. त्या बैठकीतच याबाबत निर्णय घेतला जाईल. यावर अजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही प्रतिक्रिया दिली नाही. कालच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी तानाजी सावंत आणि मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये वर्षावर मुख्यमंत्र्यांशी बराच वेळ चर्चा केली

COMMENTS