Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात

कोल्हापुर प्रतिनिधी - गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी आराम बसचा कोल्हापूरजवळ असणाऱ्या पुई खडी या परिसरात अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघ

भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
बीडमध्ये दोन अपघातात १० जणांचा मृत्यू
गुजरात मधील आणंद जिल्ह्यात भीषण अपघात

कोल्हापुर प्रतिनिधी – गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी आराम बसचा कोल्हापूरजवळ असणाऱ्या पुई खडी या परिसरात अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री अडीच वाजता अपघात झाल्याची घटना घडली. या बसमध्ये असणाऱ्या 25 प्रवाशांना अग्निशमन दलाने सुखरुप बाहेर काढले आहे. या अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात खासगी आराम बस उलटून अपघात झाल्याची घटना घडली. कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड पुईखडी येथे ही घटना घडली. यावेळी बसमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. बसमधील अंदाजे 25 प्रवासी यांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल कोल्हापूर महानगरपालिका यांनी केले. या अपघातात 4 प्रवासी बसच्या खाली अडकले. त्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली आहे. बसमधील अंदाजे 25 प्रवासी यांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल कोल्हापूर महानगरपालिका यांनी केले. या अपघातात 4 प्रवासी बसच्या खाली अडकले. त्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली आहे.

कोल्हापुरातील पुईखडी येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. नीलू गौतम(४३), रिधिमा गौतम (१७), सार्थक गौतम (१३) या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. हे सर्व प्रवासी पुण्यातील रहिवाशी आहे. या अपघतातील मृत्यूने गौतम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

COMMENTS