Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात होणार ई-पंचनामे

सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची घेणार मदत

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सातत्याने होणार्‍या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असून, पंचनामे वेळेवर होत नसल्यामुळे शेतकर्

कालव्यांच्या अस्तरीकरणाचा वेग वाढवा अन्यथा आंदोलन
दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा ः खा. जलील
प्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्रच्या पत्नीचं निधन

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सातत्याने होणार्‍या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असून, पंचनामे वेळेवर होत नसल्यामुळे शेतकर्‍यांना वेळेवर मदत मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने येत्या जूनपासून राज्यात ई-पंचनामे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, येणार्‍या काळात मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई-पंचनामा करण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना पारदर्शक पध्दतीने आणि तातडीने मदत मिळावी याकरिता सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कृषि सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री पिक विमा योजनेत आता शेतकर्‍यांना केवळ 1 रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत होणारा हवामानबदल, अवकाळी, गारपीट आणि अवर्षण अशा असंख्य समस्यांनी शेतकरी ग्रासला आहे. शाश्‍वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले तरी शेतकर्‍यांना शासनाकडून हक्काच्या मदतीची गरज असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी माहिती आधुनिक तंत्रज्ञानाची मदत यावर्षापासून घेण्यात येत आहे. शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणार्‍या मदतीत वाढ करण्यात आली असून आता एसडीआरएफच्या दुप्पट दराने शेतकर्‍यांना मदत करण्यात आली आहे. याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून (एसडीआरएफ) द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच आता 3 हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकर्‍यांना मदत देण्यात येत आहे.आपले शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी असून त्यांना आधार देणे हेच आपले कर्तव्य आहे. जून महिना सुरु झाला की वीज पडून होणारे मृत्यू आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे मृत्यू हे सर्व टाळण्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक ती खबरदारी आपल्या विभाग आणि जिल्हयांमध्ये घ्यावी अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

उष्णतेची लाट, नैसर्गिक आपत्तीवर परिषदेत चर्चा – दिवसभर चाललेल्या या राज्यस्तरीय परिषदेत महत्त्वाचे विषय तसेच फ्लॅगशिप योजनांवर विचारमंथन करण्यात आले. उष्णतेची लाट, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, प्रधानमंत्री कृषि सन्मान योजना 2.0, जलयुक्त शिवार, ई-ऑफिस, आकांक्षित शहरे आदी विषयांवर सादरीकरण आणि चर्चा करण्यात आली.

COMMENTS