Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यवतमाळमध्ये आज शेतकर्‍यांचे कापूसप्रश्‍नी आंदोलन

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

यवतमाळ ः राज्यातील कापूस आणि सोयाबीन पिकवणारे शेतकरी पिकवलेल्या मालाला  योग्य तो भाव मिळत नसल्याकारणाने राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात प्रचंड

व्हॉट्सअ‍ॅपने केले 74 लाख अकांऊट बॅन
शिक्षकांच्या सभेत गोंधळ…धक्काबुक्की व तोडफोड
जनसेवा प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर इस्लापूरच्या विध्यार्थ्या ची समर नॅशनल अबॅकस स्पर्धेत गरुड झेप.

यवतमाळ ः राज्यातील कापूस आणि सोयाबीन पिकवणारे शेतकरी पिकवलेल्या मालाला  योग्य तो भाव मिळत नसल्याकारणाने राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे , केंद्र अथवा राज्य सरकारने  शेतकर्‍यांना  निवडणुकी दरम्यान दिलेले आश्‍वासने हे फसवी असून हे दोन्ही सरकार शेतकर्‍यांच्या विरोधातील आहे अशी भावना शेतकर्‍यांचे झाली आहे. शेतीमालाला कुठलाही हमीभाव नाही त्यामध्ये  दुष्काळ शेतकर्‍यांनी पिकवलेल्या सोयाबीन व कापसाला योग्य भाव नाही या सर्व धोरणाविरुद आज 1 मार्च 2023 रोजी सकाळी,10.30 वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एसटी स्टँड, यवतमाळ येथे माजी खासदार आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते हरिभाऊ राठोड आणि  देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचंड धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे प्रसंगी अमन भाई, वसंतराव ढोके आणि शेतकर्‍यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

COMMENTS