Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 डोंबिवलीत प्रियकरांनी केली प्रेयसीची हत्या

कल्याण प्रतिनिधी- डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात जवळपास दोन वाजताच्या सुमारास एक तरुण आला. या तरुणाने मी शेजारी राहणार्या महिलेची हत्या करुन

पुण्यात तरुणाचा धारदार शस्त्राने खून
औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती ! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला भररस्त्यात संपवलं
मोबाईलवर जोरात बोलल्याच्या रागातून एकाचा खून

कल्याण प्रतिनिधी- डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात जवळपास दोन वाजताच्या सुमारास एक तरुण आला. या तरुणाने मी शेजारी राहणार्या महिलेची हत्या करुन पोलिस ठाण्यात आलो आहे असे सांगितले . हे ऐकताच पोलीस हेैराण झाले. लगेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता कल्याण शीळ रोड परिसरातील टाटा नाका परिसरातील  श्रीहरी चाळीत राहनाऱ्या वैशाली मस्तूद या ४० महिलेचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला हत्या करणारा संदीप अहिरे हा तिच्या  शेजारी राहत होता.वैशाली मस्तूद आणि संदीप अहिरे यांच्या प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधातून या दोघांमध्ये वाद झाले होते . या वादातून संतापलेल्या संदीपने आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिचे घर गाठले .तिच्या घरात कुणी नव्हते .या दोघांमध्ये वाद झाला संतापलेल्या संदीप ने ब्लेड ने वैशालीचा गळा चिरून तिची हत्या केली .वैशालिचा जागीच मृत्यू झाला .त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वैशालीला तिथे सोडून संदीपने थेट मानपाडा पोलिस ठाणे गाठले व तिथे पोलिसांना आपण केलेल्या या कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी संदीप अहिरेला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

COMMENTS