Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून

नेमकी ही हत्या कुणी केली, का केली, याचं कारण अस्पष्ट

यवतमाळ  प्रतिनिधी - यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याची हत्या करण्यात आली. सकाळी जेव्हा शेतकऱ्याची पत्नी नेहमीप्रमाणे शेतात गेली, तेव्हा पतीचा रक्ता

मुंबईत 18 वर्षीय तरूणाची हत्या
पत्नीचा गळा चिरला, मग उकळते तेल टाकले; चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या
मोबाईलवर जोरात बोलल्याच्या रागातून एकाचा खून

यवतमाळ  प्रतिनिधी – यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याची हत्या करण्यात आली. सकाळी जेव्हा शेतकऱ्याची पत्नी नेहमीप्रमाणे शेतात गेली, तेव्हा पतीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून ती हादरुनच गेली. हत्येच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय. याप्रकरणी पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. नेमकी ही हत्या कुणी केली, का केली, याचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय. महागाव तालुक्यातील काळी दौलत खान शिवारात हे हत्याकांड घडलं. या घटनेत हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव बबन वसंत राऊत असं आहे.

COMMENTS