आंतरजातीय विवाहामुळे नव दाम्पत्याला सोडावे लागले गाव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंतरजातीय विवाहामुळे नव दाम्पत्याला सोडावे लागले गाव

जळगाव : आंतरजातीय विवाहासंदर्भात अजूनही भारतीय समाजाचे मानसिकता ही मागासलेपणाची असल्याचे दिसून येते. जळगावात अशाच एका नव विवाहित दाम्पत्याला आंतरजाती

FILMY MASALA : चुकीचा सल्ला देऊ नका’ म्हणत फोटोग्राफर्सवर संतापली जान्हवी कपूर lLokNews24
आता मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष DAINIK LOKMNTHAN
केंद्र शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा ः आमदार आशुतोष काळे

जळगाव : आंतरजातीय विवाहासंदर्भात अजूनही भारतीय समाजाचे मानसिकता ही मागासलेपणाची असल्याचे दिसून येते. जळगावात अशाच एका नव विवाहित दाम्पत्याला आंतरजातीय विवाहामुळे गाव सोडण्याची नामुष्की ओढवली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एका गावात घडलेली आहे. या घटनेत आंतरजातीय विवाह करणार्‍या दाम्पत्यावर गाव सोडण्याची वेळ आलेली आहे. पारोळा तालुक्यातील या तरुण-तरुणीने एकमेकांच्या सहमतीने 15 ऑगस्ट रोजी आंतरजातीय विवाह केला होता. या लग्नाला मुलीच्या घरातील लोकांचा विरोध होता. मात्र, लग्नानंतर या दोघे जण पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी दोघांच्याही पालकांना बोलावून परिस्थिती समजून सांगून मुलगी सज्ञान असल्याने आपल्या पतीसोबत राहण्याचे मान्य केल्यामुळे कायदेशीरित्या तशी पोलिसांत नोंद झाली. मात्र, मुलीच्या घरातील सदस्यांकडून मुलाच्या नातेवाईकांना आणि त्यांला त्रास दिला जात आहे. याबाबत पारोळा पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप मुलाने केला आहे. ही कारवाई व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली आहे.

COMMENTS