उंबरे : येथील ग्रामस्थांच्या वतीने विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी बाबासाहेबांच्या

उंबरे : येथील ग्रामस्थांच्या वतीने विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस मानवंदना अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माळवाडी परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जयंतीनिमित्त गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीसह भव्य ‘स्वर मिलन’ ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भीमसूर्याची संघर्षगाथा आणि भिम- बुद्ध गीतांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. कार्यक्रमामुळे उंबरे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS