Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना फाशी द्या : पैठणमधील मोर्चात मागणी

पैठण : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी बीडनंतर पुणे आणि गुरूवारी पैठणमध्ये सर्वपक्षीयांच्या वतीने

महिलेच्या पोटात आढळला तब्बल दीड किलोचा गोळा.
आदित्य ठाकरे यांच्या सभेमध्ये पोलिसांकडून हलगर्जीपणा
गंगापूर रोडवर दोन कारचा भीषण अपघात 

पैठण : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी बीडनंतर पुणे आणि गुरूवारी पैठणमध्ये सर्वपक्षीयांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला हेाता. यावेळी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांसह देशमुख कुटुंबियांनी केली आहे.
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मुलीच्या न्यायासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. धनंजय मुंडेंनी काय करावे काय नाही हा त्यांचा प्रश्‍न आहे. कारण ते लाभार्थी टोळीला रस्त्यार उतरवत आहे. त्यांना हे कळत नाही की एका लेकींने आपला वडील, एका भावाने आपला भाऊ, तर एक माय माऊलीने आपला मुलगा गमावला आहे असे जरांगे यावेळी म्हणाले

COMMENTS