Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूरमध्ये महिला आयोगाच्या सुनावणीत 93 तक्रारींचा निपटारा

लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने सर्वच महिलांना आपले प्रश्न आयोगाकडे मांडता येत नाहीत. त्यामुळे ‘महि

संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली
आमदारांच्या आत्रतेवर सर्वोच्च डेडलाईन
कामिका एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी

लातूर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने सर्वच महिलांना आपले प्रश्न आयोगाकडे मांडता येत नाहीत. त्यामुळे ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्यातील 28 जिल्ह्यात महिला आयोग पोहचला आहे. या माध्यमातून जवळपास 18 हजार प्रकरणांमध्ये महिलांना न्याय मिळवून दिला गेला. महिलांच्या न्यायासाठी शासनानी केलेले कायदे महिलांपर्यंत जावेत. महिलांनी ते प्रयत्नपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करावा, हेही या उपक्रमातून आम्ही सांगत आहोत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले. लातूरमध्ये महिला आयोगाच्या 93 तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत सोमवारी लातूर येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित जनसुनावणीप्रसंगी श्रीमती चाकणकर बोलत होत्या. या जनसुनावणीमध्ये महिलांच्या 93 तक्रारी दाखल झाल्या. तीन पॅनलच्या माध्यमातून या तक्रारींवर सुनावणी घेवून त्याचा निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी देवदत्त गिरी, महिला आयोगाचे समन्वयक गंगापुरे आदी यावेळी उपस्थित होते. समाजात आजही बालविवाह, स्त्री-भ्रूणहत्या होत आहेत हे गंभीर असून याबाबतीत सर्वसामान्यांनी आमच्यापर्यंत तक्रारी द्याव्यात. लातूर जिल्हा प्रशासनाने याबाबतीत ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या यंत्रणांना असे विवाह रोखण्यासाठी आदेश काढावेत. एवढेच नाही तर बालविवाह जिथे होतील, अशा मंगल कार्यालय, अशा लग्नाची पत्रिका छापणारे प्रिंटर्स यांच्यावरही कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घूगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधिकारी सोमय मुंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यानंतर विविध विभागांमार्फत महिलांसाठीच्या योजनांची अंमलबाजवणी, हिरकणी कक्ष, प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी विशाखा समिती स्थापन करणे या संदर्भातील सादरीकरण झाले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर,जिल्हा महिला बाल विकास अधिकारी देवदत्त गिरी उपस्थित होते.

COMMENTS