Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी खा. राजू शेट्टी यांची आक्रोश यात्रा आज सांगलीत

इस्लामपूर / प्रतिनिधी : ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन 400 हप्तासाठी व राज्यातील साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन व डिजिटल करावेत. या प्रमुख मागणीसा

मंगळवारी ना. शंभूराज देसाई यांचा जनता दरबार
प्रतीक पाटील हे राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी …?
रणजितसिंह देशमुख यांची भारत जोडो यात्रा जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती

इस्लामपूर / प्रतिनिधी : ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन 400 हप्तासाठी व राज्यातील साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन व डिजिटल करावेत. या प्रमुख मागणीसाठी 17 आक्टोबरपासून माजी खा. राजू शेट्टी यांची आक्रोश यात्रेसाठी सुरवात झाली आहे. सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, गेल्या महिनाभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 1 जुलै पासून जनजागृती अभियानाला सुरुवात केली आहे. 13 सप्टेंबर रोजी उपप्रादेशिक साखर आयुक्त कोल्हापूर कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला होता. 2 गांधी जयंतीच्या आक्टोबर सांगली जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते. तरीही साखर कारखान्याना जाग येत नव्हती. म्हणून खा. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर व सांगली, सातारा जिल्ह्यातील 522 किलोमीटर अंतरच्या पायी प्रवास करण्याचा निश्‍चित करण्यात आला होता. आज सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील या यात्रेचा प्रवेश करणार असून आज दि. 28 आक्टोबर निनाई दालमिया शुगर करंगळी 29रोजी विश्‍वासराव नाईक साखर कारखाना चिखली, 30 आक्टोबर रोजी राजारामबापू पाटील साखर कारखाना युनिट क्रमांक 2 वाटेगाव, 31 आक्टोबर सातारा जिल्ह्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना शिवनगर, 1 नोव्हेंबर रोजी राजारामबापू पाटील साखर कारखाना साखराळे व क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल तर 2 नोव्हेंबर हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना वाळवा, 4 नोव्हेंबर रोजी वसंतदादा सहकारी साखर कारखाना सांगली 5 नोव्हेंबर सर्वोदय सहकारी राजारामबापू युनिट क्रमांक 3 या प्रमुख साखर कारखान्यावर पदयात्रा जाणार असून पुढे कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणार 7 नोव्हेंबर जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत ऊस दराची व आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
गावागावुन घरची भाकरीची शिदोरी
पदयात्रेचा मुक्काम बिळाशी, पाडळी, तांबवे, रेठरे हरणाक्ष, कुंडल, वाळवा, नांद्रे, तुंग, गावात मुक्काम होणार आहे. या गावातील व आजुबाजुच्या खेडेगावातून प्रत्येक घरटी दोन भाकरी व सुकी भाजी गोळा करून पदयात्रेतील शेतकर्‍यांची जेवणाची सोय करण्यात येणार आहे. जो पर्यंत 400 दुसरा हप्ता मिळत नाही तोपर्यंत ऊसतोड घेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS