कल्याण प्रतिनिधी - औरंगाबाद वरून छत्रपती शिवाजी टर्मिनस ला येणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना आज पहाटे साडेआठच्या सुमारास घडली आहे.
कल्याण प्रतिनिधी – औरंगाबाद वरून छत्रपती शिवाजी टर्मिनस ला येणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना आज पहाटे साडेआठच्या सुमारास घडली आहे. ही घटना आंबिवली ते शहाड दरम्यान घडली असून या घटनेत दिवा परिसरात राहणाऱ्या रमाबाई पाटील नावाची महिला जखमी झाली असून तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या या महिलेवर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस महिलेचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
COMMENTS