नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात गुरूवारी राजधानीत सर्वपक्षीय नेत्

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात गुरूवारी राजधानीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी या बैठकीला संबोधित करतांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारताला परिस्थिती आणखी चिघळायची नाही. पण जर पाकिस्तानने काही आगळीक केल्यास भारत शांत बसणार नाही. या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगेंनीही बैठकीला हजेरी लावली होती.
COMMENTS