गड ठरवणं हे शेलार मामा शिवाय कोण ठरवू शकतं ?

Homeताज्या बातम्या

गड ठरवणं हे शेलार मामा शिवाय कोण ठरवू शकतं ?

जांबोरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है आशिष शेलारांचा सूचक इशारा

मुंबई प्रतिनिधी- भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेवर मात केली आहे. वरळीत शिवसेनेचे  तीन आमदार आणि एक खासदार असूनही

दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी ?
राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन आलेले सरकार कोसळणारच.
आदित्य ठाकरे वाघ, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खाताहेत.

मुंबई प्रतिनिधी- भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेवर मात केली आहे. वरळीत शिवसेनेचे  तीन आमदार आणि एक खासदार असूनही शिवसेनेला वरळीचं जांबोरी मैदान मिळवता आलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थ निर्माण झाली आहे. आज भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी काही सूचक विधाने केली आहेत. गड कुणाचा? कोणी ठरवलं? गड ठरवणं हे शेलार मामा शिवाय कोण ठरवू शकतं? आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) हे युतीत निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही गड मानत नाही. आम्ही मुंबईत 227 ठिकाणी दहीहंडी साजरा करत आहोत. जांबोरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है, असा सूचक इशारा आशिष शेलार यांनी दिल्याने त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

COMMENTS