Homeताज्या बातम्यामनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई ः मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झु

विडी कामगारांना मिळाली घर बांधण्यासाठी हक्काची जागा
रशियाच्या ऑलिम्पिकमधील सहभागावर या देशांंचा आक्षेप
खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत घातली हुज्जत

मुंबई ः मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथेच त्यांचे निधन झाले आहे.
विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या. विजय कदम यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक मोठी हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सिनेसृष्टीच्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. आज अंधेरी येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम 67 वर्षांचे होते. पत्नी आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. गेल्या दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. विजय कदम यांनी रंगभूमी सोबतच मराठी चित्रपटात देखील काम केले होते. ’विच्छा माझी पुरी करट हे त्यांचे लोकनाट्य आणि ’खुमखुमी’ हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर गाजले होते. या कार्यक्रमापासून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. 1980च्या दशकात छोट्या-मोठ्या विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांचे चष्मेबहाद्दर, पोलीसलाईन, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघ राजा राणी हे चित्रपट खूप गाजले. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

COMMENTS