जागतिक भांडवलदारांच्या आर्थिक सत्ताकारणाचा भारतीय अर्थ!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

जागतिक भांडवलदारांच्या आर्थिक सत्ताकारणाचा भारतीय अर्थ!

शिया-युक्रेन युध्द आणि त्यात युनो व नाटो देशांचा अप्रत्यक्ष सहभाग या बाबींचा एक जागतिक अर्थ काढला तर त्यात एक वैशिष्ट्यपूर्ण बाब दिसते ती म्हणजे भांड

राजीनामासत्र आणि सरकारचा दबाव
अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरणार वादळी
हवामान बदलाचे वाढते धोके

शिया-युक्रेन युध्द आणि त्यात युनो व नाटो देशांचा अप्रत्यक्ष सहभाग या बाबींचा एक जागतिक अर्थ काढला तर त्यात एक वैशिष्ट्यपूर्ण बाब दिसते ती म्हणजे भांडवलदारांचा आर्थिक स्वार्थ! भांडवलदारांचे एक जागतिक अर्थकारण असून ते जगभरातील राजकारणच नव्हे तर सत्ताकारण करण्यात त्यांचा कसा सहभाग आहे, हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतीय जागतिक अर्थकारणाची सुरूवात सत्ताकारणातून कशी झाली, हे देखील महत्वाचे आहे!भारतीय लोकशाही समोर आज उभे ठाकलेल्या अरिष्टाची पायाभरणी सन १९९१ मध्ये काँग्रेसनेच केली यास लोकशाही मानणारा कोणताही सुज्ञ माणूस नकार देणार नाही. याबरोबरच भारतात जागतिकीकरणाची सुरूवात झाली. या नव्या व्यवस्थेला भारतात दोन प्रकारच्या संघटनांनी विरोध केला होता; त्यातील पहिल्या प्रकारच्या संघटनांमध्ये आंबेडकरी विचारांच्या संघटनांचा समावेश होता तर दुसऱ्या प्रकारात डाव्या संघटनांचा! या दोन्ही प्रकारच्या संघटनांनी केलेला विरोध हा जनसामान्यांच्या हितापेक्षाही आपापल्या वर्गीय हितसंबंधांना लक्षात ठेवूनच केला होता! त्यामुळे भविष्यात लोकशाही व्यवस्थेवर येणाऱ्या भयावह अरिष्टाची पुरेशी कल्पना करताच आली नाही, असे म्हणने आज क्रमप्राप्त आहे. भारतात जागतिकीकरणाच्या अरिष्टाला केलेला विरोध हा नामधारी होता तो दोन अर्थांनी! डाव्यांचा विरोध हा १९८९ मध्ये बर्लिन भिंत खुली झाली तेव्हाच तात्विकदृष्ट्या संपला होता. तर भारतात स्वीकारण्यात आलेले खाजगीकरण उच्चजातवर्णियांच्या हिताचेच असल्याने डाव्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीचे जातवर्गिय संरक्षण त्यात पाहिले. तर दुसऱ्या बाजूला आंबेडकरी विचारांचा दावा करणाऱ्या मध्यमवर्गीय संघटनांनी जागतिकीकरणाचा विरोध केला नाही तर त्याच्यातील खाजगीकरणाला त्यांनी विरोध केला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत या देशाला राष्ट्र बनविण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्या अनुषंगाने विचार करताना प्रत्येक क्षेत्रात देश स्वयंपूर्ण करणे, हे ध्येय त्यांनी आमच्या पुढे ठेवले. या देशातील उच्च-जातवर्णिय या ध्येयाच्या विरोधात होते व आहेत. म्हणूनच जागतिकीकरणाच्या काळापूर्वीच त्यांची मुले देशाच्या साधन-स्त्रोतांचा उच्च शिक्षणासाठी उपभोग घेऊनही सेवा मात्र विदेशात जाऊन देत होते. हा प्रश्न ब्रेनड्रेन चा प्रश्न म्हणून चर्चेला घेतला जात असे. परंतु खरे तर उच्च जातीयांनी केलेला तो देशद्रोह होता. याउलट जागतिकीकरणानंतर त्यांची मुले सिलिकॉन व्हॅलितून भारतात परतली ती या देशातील सत्ता हातात घेण्यासाठी! याउलट ते जागतिकीकरणाच्या अरिष्टामुळे परतली म्हणून त्यांना देशात सहानुभूती मिळत होती. खरेतर सिलिकॉन व्हॅलितून परतणारे जगातील भांडवदारांशी हातमिळवणी करूनच देशात दाखल झाले होते. ही बाब भारतीय लोकशाहीला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणारे संघिय विचारांचे सत्ताधारी आणि विरोधक यांनी चालविलेल्या संयुक्त प्रयत्नातून दिसून येतो.  बर्लिन ची प्रख्यात भिंत पाडण्यापासूनच जगभरातील लोकशाही व्यवस्थेला संपुष्टात आणण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे सांगून ते जगभराचे अनेक दाखले देतात. यासाठी जगभरातील भांडवलदार एक झाले आहेत. लोकशाही व्यवस्था  मारली जात आहे.

COMMENTS