Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनतेच्या मनात वसलेला ‘विरु’ हरपला! :  मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, दि.२४: सुप्रसिद्ध चित्रपट ‘शोले’ मधील आमचा लाडका ‘विरु’ हरपला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे,” अ

खेलो इंडीयामुळे ग्रामीण खेळाडूना मोठी संधी : डॉ. सुस्मिता विखे पाटील
केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महापालिकेला पत्र
माहूर तीर्थक्षेत्र विकासासाठी 829 कोटींच्या आराखड्यावर चर्चा; पालकमंत्री सावे यांची आढावा बैठक

मुंबई, दि.२४: सुप्रसिद्ध चित्रपट ‘शोले’ मधील आमचा लाडका ‘विरु’ हरपला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे,” अशा शब्दात अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

मंत्री झिरवाळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे, भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान कलाकाराने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या जबरदस्त अभिनयामुळे ते चित्रपट रसिकांच्या मनात कायम जिवंत राहतील. धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना मंत्री झिरवाळ यांनी केली.

COMMENTS