Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायगडमध्ये तटकरे-गोगावले वाद टोकाला

रायगड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील तटकरे आणि गोगावले यांचा वाद टोकाला पोहचला आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्य

नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी अमोल खोले
मराठीचा अमराठीशी सुखाने संसार ! ; साहित्य संमेलनातील परिसंवादाचा सूर
सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – उद्योगमंत्री उदय सामंत

रायगड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील तटकरे आणि गोगावले यांचा वाद टोकाला पोहचला आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या तुफान हाणामारीनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले म्हणाले की, विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड हे सुनील तटकरे यांनीच पाठवले होते. जे आम्हाला गुंड म्हणतात, तेच स्वतः गुंड पाठवून षडयंत्र रचत आहेत. आम्ही कोणती दंडेलशाही करत नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर हत्यारे घेऊन हल्ला करण्यासाठी गुंड पाठवले गेले. जशास तसे उत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी दिलं आहे. पोलिस चौकशीनंतर या घटनेचा तपास केला जाईल. आमच्यावर हत्यारे घेऊन येणार्‍या या हल्लेखोरांची चौकशी सर्वांसमोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS