Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायगडमध्ये तटकरे-गोगावले वाद टोकाला

रायगड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील तटकरे आणि गोगावले यांचा वाद टोकाला पोहचला आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्य

अहिल्यादेवींचे लोकोपयोगी कार्य हेच त्यांचे खरे स्मरण : प्रा. डॉ. यशपाल भिंगे
कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करून सरसकट सातबारा कोरा करामाकपा व अखिल भारतीय किसान सभेचे माहूर तहसील कार्यालयावर आंदोलन; तहसीलदारांना निवेदन
२५० लोकसंख्येच्या ठिकाणी ‘पीएमजीएसवाय’ राबविण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

रायगड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील तटकरे आणि गोगावले यांचा वाद टोकाला पोहचला आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या तुफान हाणामारीनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले म्हणाले की, विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड हे सुनील तटकरे यांनीच पाठवले होते. जे आम्हाला गुंड म्हणतात, तेच स्वतः गुंड पाठवून षडयंत्र रचत आहेत. आम्ही कोणती दंडेलशाही करत नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर हत्यारे घेऊन हल्ला करण्यासाठी गुंड पाठवले गेले. जशास तसे उत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी दिलं आहे. पोलिस चौकशीनंतर या घटनेचा तपास केला जाईल. आमच्यावर हत्यारे घेऊन येणार्‍या या हल्लेखोरांची चौकशी सर्वांसमोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS