मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म विस्तार आणि पुनर्विकासाच्या कामांमुळे मध्य रेल्वेने कोकण मार्गावरील का

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म विस्तार आणि पुनर्विकासाच्या कामांमुळे मध्य रेल्वेने कोकण मार्गावरील काही गाड्यांचे अंशतः रद्दीकरण २९ मे पर्यंत वाढवले आहे. काही गाड्या सीएसएमटीऐवजी दादर किंवा ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टी संपवून कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास अत्यंत त्रासदायक होणार आहे.
कन्फर्म तिकीट न मिळणे, गाड्या विलंबाने धावणे यांमुळे मजल दरमजल करत कोकणवासी गावी पोहोचले होते. आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाल्याने कोकणवासी मुंबईतील घराकडे परतत आहेत. मात्र, या प्रवासातही अडचणींचा डोंगर त्यांची पाठ सोडायला तयार नाही. तेजससह मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी यांसह अन्य गाड्या तासनतास विलंबाने धावत आहेत.
काही प्रवाशांना रेल्वे स्थानकात उतरून उपनगरात जायचे असल्याने त्यांची अधिकच कोंडी झाली आहे. दक्षिण मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना मोठ-मोठ्या बॅगांसह लोकलने प्रवास करताना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अधिक गैरसोय होत आहे. अनेकांना टॅक्सीचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याने आर्थिक भारही सहन करावा लागत आहे. प्रवासाचा वेळ आणि प्रवास खर्च दोन्ही वाढत आहे. त्यात आता काही गाड्या केवळ दादर आणि ठाण्यापर्यंत धावणार असल्याने कोकणवासीयांची मोठी दमछाक होणार आहे.

COMMENTS