मान्सून अंदमानात दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मान्सून अंदमानात दाखल

राज्यातील 9 जिल्ह्यांना येलो अलर्ट ; पाच दिवस अगोदरच केरळमध्ये धडकणार

मुंबई : मान्सून सोमवारी अंदमानच्या समुद्रकिनार्‍यावर दाखल झाल्यामुळे केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सून अं

कृषी कंन्याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
महाबळेश्‍वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ
Jalna : सत्ताधारी पक्षाचे मंत्री फक्त दौरे करतात- दानवे (Video)

मुंबई : मान्सून सोमवारी अंदमानच्या समुद्रकिनार्‍यावर दाखल झाल्यामुळे केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सून अंदमानच्या समुद्रकिनार्‍यावर दाखल झाल्यामुळे 16 ते 19 मे दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. दरम्यान, हवामान विभागाने यंदाही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे लाही-लाही होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून देशात वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांवर 15 मे रोजी पहिला हंगामी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे पुढे मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. हवामानतज्ञांच्या मते, पूर्व मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मान्सून आधी केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकेल. केरळमध्ये मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती. मात्र, पुढच्या दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात विषुववृत्त ओलांडून नैऋत्येकडे झेपावणारे दमदार पावसाळी वारे तसेच ताशी 45 किमी झटक्याखाली पुढील पाच दिवस वाहणार्‍या वार्‍यामुळे अंदमान, निकोबार बेटे, व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता जाणवत असल्याचे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. पश्‍चिम बंगाल आणि ईशान्येकडील सात राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पूर्व मोसमी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी दिली. मान्सूनचा प्रवास वेगाने अंदमान बेटांकडे झाल्यामुळे दक्षिण भारतात अतिवृष्टी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात अजूनही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दक्षिणेत पाऊस तर, उत्तर भारतात उष्णतेची लाट
मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर दक्षिण भारतात जोरदार पावसाला सुरूवात झत्तली आहे. मात्र उत्तर भारतात अजूनही तापमान उच्च असून, तेथे उष्णतेच्या लाटेचा इशारा वर्तवण्यात आला आहे. केरळ, आसाम, मेघालय आणि पश्‍चिम बंगालमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. तर उत्तर भारतात अजूनही तापमान 45 ते 49 अंश सेल्सिअसवर गेले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान 40 ते 44 अंशावर गेले आहे.

COMMENTS