Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाड्यासह विदर्भात भूकंपाचे सौम्य धक्के

छ.संभाजीनगर ः मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात बुधवारी भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिक भयभीत झाले होते. भूकंपाच्या धक्क्यान

राजधानीत भूकंपाचे तीव्र धक्के
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाने हाहाकार
राजधानीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

छ.संभाजीनगर ः मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात बुधवारी भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिक भयभीत झाले होते. भूकंपाच्या धक्क्यानंतर अनेकांनी मोकळ्या जागेत धाव घेतली होती. हिंगोली, परभणी, नांदेडसह वाशिम जिल्ह्याला बुधवारी सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. सकाळीच प्रशासकीय यंत्रणेने या भूकंपाची तीव्रता आणि कुठे हानी झाली का याचा आढावा घेतला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विदर्भातील वाशिम जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पैठण तालुक्यातील पाचोड येथे सकाळी 7:15 मिनीटाला धक्के जाणवले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातही भूंकपाचे धक्के जाणवले. परभणी शहर, सेलू, गंगाखेड, हिंगोलीतील पिंपळदरी, राजदरी, वसमत भागाला सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. 2 महिन्यांपूर्वी सुद्धा या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि आजूबाजूच्या भागात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. तर रामेश्‍वर तांडा भागतही भूंकपाचे हादरे बसले होते. हिंगोली शहर व हिंगोली सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता र्श्टिर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्‍वर तांडा गावात आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर अकोला जिल्ह्यातील काही भागातही धक्के बसले. अमरावती, चंद्रपूर ते तेलंगणात करीमनगरपर्यंत भूकंपाचे धक्के बसल्याचे दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन हिंगोली जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. भूंकपाचे सतत धक्के जाणवत आहेत. हिंगोली आणि परभणीत असे प्रकार समोर येत आहेत. या भूकंपची तीव्रता र्श्टिर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. ही तीव्रता अधिक आहे. त्यामुळे भूवैज्ञानिक सर्वेक्षण करावे असे मत एमजीएम अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक तथा हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS