मुंबई/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपकडून रणनीती आखण्यात येत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्

मुंबई/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपकडून रणनीती आखण्यात येत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेत अभिनेत्री माधुरी दीक्षित, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईतील एका मतदारसंघातून माधुरी दीक्षीत, जळगावमधून उज्ज्वल निकम, धुळ्यातून प्रतापराव दिघावकर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनिल देवधर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा झाली आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. बैठकीत आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सागर बंगल्यावर इतर भाजप आणि शिंदे गटातील नेते उपस्थित होते. मात्र अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यां तिघांमध्येच बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर हे ज्याप्रकारे आमदार अपात्रतेबाबतचा प्रश्न हाताळत अहेत, त्यावर ताशेरे ओढले होते. तसेच याप्रकरणी कारवाई कुठपर्यंत पोहचली, याबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता ही सुनावणी वेगाने केली जाऊ शकते. त्यामुळे यामध्ये येणार निर्णय आणि त्याचे पुढील राजकारणावर होणारे परिणाम याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
COMMENTS