Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा कायम

बेळगावातील महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना परवानगी नाकारली

बेळगाव/वृत्तसंस्था - महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सीमाप्रश्‍न वाद काही प्रमाणात शांत झाला असला तरी, हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यत

छ.संभाजीनगर शहर आज बंदची हाक
लाडशाखीय वाणी समाजाच्‍या वतीने इंग्‍शिल मिडीयम स्‍कूल, अभ्यासिकेचे उभारणी
नवी मुंबईत भाजपमध्ये राजीनामासत्र

बेळगाव/वृत्तसंस्था – महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सीमाप्रश्‍न वाद काही प्रमाणात शांत झाला असला तरी, हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केल्यानंतर सीमाप्रश्‍नाचा वाद थंड झाला होता, मात्र बेळगावात होत असलेल्या महामेळाव्यात महाराष्ट्रातील नेते सहभागी होणार होते. मात्र कर्नाटक सरकारने या नेत्यांना परवानगी नाकारल्यामुळे दोन्ही राज्यातील सीमाप्रश्‍न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सीमाभागत येण्यासाठी कुणालाही अडवणार नाही, असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. मात्र कर्नाटक सरकारची दुटप्पी भूमिका काही दिवसातच समोर आली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये महामेळाव्यासाठी जाणार्‍या नेत्यांना कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली. कर्नाटक राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर बेळगावमध्ये 4 हजाराहून अधिक पोलिस तैनात आहे. मात्र कायदा सुव्यव्यस्थेचे कारण देत पुन्हा कर्नाटक सरकारने राज्यातील नेत्यांना परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला महाराष्ट्रातून येणार्‍यांना परवानगी दिली जाणार नाही. बेळगावातील जे लोक महामेळाव्याला येतील त्यांना आम्ही अडवणार नाही. मत्र खासदार धैर्यशील माने यांना बेळगावला येण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असे कर्नाटकचे कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. महाराष्ट्रातून येणार्‍या कोणालाही बेळगावातील महामेळाव्याला येण्यास अनुमती दिली जाणार नाही. महामेळावा होणार असलेल्या ठिकाणी आलोक कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना त्यांनी पोलिस अधिकार्‍यांना दिल्या आहेत. महामेळाव्यासाठी एका एसपी अधिकार्‍यासह पाचशेहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले असून, या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे.

COMMENTS