Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपर्डीतील ग्रामपंचायतच्या गाळ्यांवरील पत्रे उडाले

कर्जत ः मंगळवारी (दि.21) सायंकाळी कर्जत तालुक्याच्या विविध भागात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेतातील पिकांचे मो

अंबादासशेठ नाईकवाडी यांचे निधन
फळबागांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करा
मित्राच्या निधनाचा धक्का पचेना, 28 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या | LOKNews24

कर्जत ः मंगळवारी (दि.21) सायंकाळी कर्जत तालुक्याच्या विविध भागात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कोपर्डी येथे ग्रामपंचायतच्या वतीने बांधण्यात आलेल्या 10 गाळ्यांचे मोठे नुकसान झाले. गाळ्यांवरील अनेक पत्रे उडून गेले. यामध्ये खते तसेच पशुखाद्याचे मोठ्या नुकसान झाले, असल्याची माहिती राहुल नवनाथ सुद्रिक यांनी दिली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे आंबा, डाळिंब आदी फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

COMMENTS