Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

40 हजार पदांची जम्बो भरतीची घोषणा

महापालिक, नगरपरिषदांमध्ये होणार भरती

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने 75 हजार भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बुधवारी राज्य सरकारने सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि न

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन
दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला
स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी : डॉ. सागर बोरुडे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने 75 हजार भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बुधवारी राज्य सरकारने सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये 40 हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले आहेत. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ’अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकार्‍यांची परिषद झाली, यात मुख्यमंत्री बोलत होते.    

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये 55 हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील 40 हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. यावेळी राज्य संवर्गाचे एकूण 1983 पदे संचालनालयामार्फत व  नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 8490 पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करुन मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  

दरम्यान, महापालिका, नगरपरिषदांच्या शाळा आणि रुग्णालयांना आयुक्त आणि मुख्याधिकार्‍यांनी भेटी देऊन स्वच्छतेवर भर द्या, ज्येष्ठ नाग़रिक आणि गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री  शिंदे यांनी दिल्या. कोविडपासून खबरदारी घेण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यासह रुग्णालयांच्या इमारती तेथील ऑक्सिजन आणि अग्निशमन सुविधांचे परीक्षण करुन घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेकडे रुग्ण खाटा, व्हेंटिलेटर, डायलिसिस यंत्रे आदी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असून नगरपालिकांना ती विनामूल्य देण्यात येणार आहे, नगरपालिकांनी ही सामुग्री घेऊन जाण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

COMMENTS